वॉर्ड 43 ला 24×7 पाणी दशक भराचे स्वप्न साकार

राजकीय वळणांमुळे विलंब झालेल्या योजनेला पुन्हा जीव: आमदार अभय पाटील

₹240 कोटींच्या योजनेला अखेर प्रत्यक्ष रूप
राजकीय अडथळ्यांनंतर पुन्हा सुरू झालेली महत्त्वाची योजना

स्थानिक नागरिकांना दिलासा देणारी पाणीपुरवठा व्यवस्था

बेळगाव, दि.13:
दशकाहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर बेळगाव दक्षिण मतदारसंघातील वॉर्ड क्र.43 मध्ये निरंतर (24×7) शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजनेला प्रारंभ झाला आहे. अनेक टप्प्यांवर अडथळे आलेल्या या योजनेला आता प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Huiयोजनेचे उद्घाटन करताना आमदार अभय पाटील म्हणाले, “विकास हा जात, धर्म, पंथ किंवा राजकीय फायद्याचा विषय नसतो. लोकांच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे.”
2017 साली सुमारे ₹240 कोटींच्या निरंतर पाणीपुरवठा योजनेला बेळगावसाठी मंजुरी मिळाली होती. मात्र विविध प्रशासकीय व राजकीय कारणांमुळे ही योजना स्थगित झाली होती आणि निधीही पुन्हा केंद्राकडे परत गेला होता.
2018 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दिल्लीमध्ये अनेक स्तरांवर प्रयत्न करून ही योजना पुन्हा बेळगावात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे अभय पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेत माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले, असेही त्यांनी सांगितले.

या योजनेमुळे वॉर्ड क्र.43 मधील नागरिकांना दिवसाचे 24 तास शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाण्याच्या समस्येचे यामुळे कायमस्वरूपी समाधान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महापौर मंगेश पवार म्हणाले की, आमदार अभय पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही योजना शक्य झाली आहे. दिल्लीला वारंवार जाऊन केंद्र सरकारवर दबाव आणत योजना पुन्हा सुरू करून घेतली, हे उल्लेखनीय आहे.

Oplus_16908288

उपमहापौर वाणी विलास जोशी म्हणाल्या, “या भागात पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रास देत होती. आता 24×7 पाणीपुरवठा व्यवस्था सुरू झाल्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.”
या कार्यक्रमाला अरुण गौळी, Ranjana Naik, sanjeev kulkarni, N S deshpande, arun gawade यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Oplus_16908288

मतदानाच्या निर्णयामुळे 10 वर्षांचा विलंब?
योजनेबाबत बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, 2012 मध्येच या कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते; परंतु राजकीय घडामोडींमुळे ते पुढे ढकलले गेले.
2013 च्या निवडणुकीनंतर आवश्यक प्रगती न झाल्यामुळे योजनेचा निधी पुन्हा केंद्राकडे परत गेला. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी सुमारे दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागली, असे त्यांनी सांगितले.

मतदार यादी पुनरावलोकनाबाबत सूचना
दक्षिण मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेबाबत नागरिकांनी सजग राहावे, असे आमदार अभय पाटील यांनी आवाहन केले.
2002 आणि 2023 मधील नोंदींमध्ये तफावत असल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करून पडताळणी करून घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!